आम्ही जागं व्हायलाच हवं
आज आसपास वावरताना असंख्य प्रश्नांची वावटळे उठताना दिसतात. आपल्या आजूबाजूला सतत कसल्यातरी दाहक वादळांची नांदीच होताना दिसते. रोज पेपर उघडला कि पहिल्या पानावर ज्या बातम्या असतात त्या वाचून आपल्या देशात नेमकं चाललंय काय याचाच प्रश्न पडतो. कुठे सुरु असलेले झुंडबली, बलात्कार, ऑनर किलिंग ह्यांसारख्या बातम्या आणि त्यांना जोड द्यायला रोज सीमेवर घडणारे जवानांचे मृत्यू आणि ह्या सर्वांवर वरकड म्हणजे वरील सर्व गोष्टींबद्दल राजकारण्यांकडून दाखवली जाणारी संतापजनक अनास्था. ह्या सर्व गोष्टींनी डोकं सुन्न होऊन जाते. पण ह्या सर्व गोष्टी वाचल्या- ऐकल्या नंतर एक प्रश्न मात्र कायम घुमत राहतो तो म्हणजे आपण नेमका करतोय काय? ह्या सर्व गोष्टींबद्दल कुठेतरी देशाच्या कोपऱ्यात एक क्षीण आवाज उठतो आणि मग परत सगळं जैसे थे होत. असं का होतंय? आपण नेमका करतोय काय? मागे दिल्लीत निर्भया हत्याकांड झालं तेव्हा दिल्लीत तरुणांचे असंख्य मोर्चे निघाले अगदी उग्र म्हणावी अशी निदर्शे झाली पण त्यानंतरही महाराष्ट्रात कोपर्डीचं किळसवाणा हत्याकांड झालं त्यानंतर महाराष्ट्रात मराठा समाजाचे मोर्चे निघाले पण त्यानंतर मूळ मुद्दा बाजूलाच पडू मराठा आरक्षण केंद्रस्थानी आले आणि मूळ मुद्दा असलेली स्त्रियांची सुरक्षितता हा ममूद्दा कुठे उडून गेला ते कळलंच नाही, आणि तिथेही परिस्थिती जैसे थेच झाली. आज रोज शेतकरी आत्महत्या हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला जातोय त्याबद्दल सरकार कडून काढत असलेल्या योजनाही मोठ्या चवीने चघळल्या जात आहेत पण शेतकरी महाराष्ट्रातून शेतकरीच हद्दपार होऊन नुसता त्याबद्दल राजकारणच चालू आहे. जे आत्महत्यांबाबत तेच दुष्काळ, पूर यांबाबत सर्वत्र चालू आहे ते राजकारण. मग आम्ही नेमका करतोय काय? भारत हा तरुणांचा देश आहे तर मग आम्ही तरुण नेमका करतोय काय?जे राजकारणी आमच्यावर राज्य करत आहेत ते तरी सुसंस्कृत आहेत का? आपल्याकडे सर्वात हास्यास्पद गोष्ट आहे ती म्हणजे मंत्री निरक्षर चालतो पण त्याचा पी.. लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेला असला पाहिजे. आणि हे राजकारणी संसदेत जाऊन जो तमाशा घालतात तो बघून तर एक दिवस तिकडे फोटोंमधले टांगलेले सर्वच महापुरुष फोटोंमधून उठून जातील असाच वाटतं. सगळीकडे सगळंच कास विचित्र होत चाललं आहे आणि कुठल्याही गोष्टीच आपल्याला काहीच वाटत नाही हे सर्वात विचित्र आहे. हे सर्व बदलायला हवं, आपले सर्वच प्रश्न म्हणजे बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, हरवत जाणारी सुसंस्कृता, दिवसेंदिवस हरवत जाणारे आर्थिक सामाजिक स्थैर्य ह्या सर्वच प्रश्नांवर विचार होणं गरजेचं आहे. नुसतेच विचार करून भागणार नाही तर कृतीची जोड सुद्धा द्यायला हवी त्यास. हे सर्व व्हायलाच हवं आणि ते आपल्यालाच करणं भाग आहे. आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्यालाच शोधावी लागतील सर्व प्रश्नांची उत्तरे एकदम सापडणार नाहीत पण थोडी थोडी करून सर्वच उत्तरे शोधायला हवी आणि ते आपणच करू शकतो आणि कोणी नाही कारण हा देश आपला आहे आणि जेव्हा आपण त्यास आपला म्हणवतो तेव्हा त्याच भविष्य सुखकर करण्याची नैतिक जवाबदारीहि आपलीच असते. तेव्हा आपल्याला जागं व्हायलाच हवं , डोळ्यांवर बुद्धीवर चढलेली अविचाराची, अकृतीशील पणाचीपुटं काढून टाकायलाच हवीत पुन्हा बळ बांधून उठायलाच हवं. लय होईल फार तर लगेच यासह मिळणार नाही पण आज अपयश जरी आलं तरी त्यावर उद्या कोणीतरी यशाची पताका नक्कीच फडकावले नक्कीच. पण त्या उद्यासाठी आज उठायला हवं झटून काम करायलाच हवं प्रश्नांची उत्तरे शोधायलाच हवीत त्यानेच उद्याची नवी पाहत उगवे हा सगळं अंधार निघून जाईल आणि भविष्याची सुंदर पाहत उगवेल आणि हीच स्वातंत्र्यासाठी खर्ची पडलेल्या सर्व महात्म्यांस खरी श्रद्धांजली असेल

Comments

Popular posts from this blog