शिवचरित्र निबंधावली भाग १ शिवचरित्र निबंधावली हे मराठी इतिहास संशोधन साहित्यातील एक महत्वाचे साधन. त्यावरची ही लेखमालिका. ह्या लेखमालिकेत ह्या निबंधावलीचा अनुक्रम दोन घेण्यात आला असून ह्याचे संपादन न. चिं. केळकर व द. वि. आपटे ह्यांनी केले आहे. ह्या लेखमालिकेतून आपण शिवचरित्राचा आपल्या कुवतीनुसार अभ्यास करणार आहोत, ह्यात कुठेही एकांगी भूमिका न घेता निःपक्षपातीपणे लिखाणाचा प्रयत्न करून एक उपयुक्त मालिका सादर करता यावी यासाठी प्रयत्न करू. ह्यातून ह्या लेखांमधून आलेली माहिती, त्याचे विश्लेषण , कधी कधी आपली मते यांचेही स्पष्टीकरण करू. भोसल्यांचे राजपूतत्व :- शिवाजी महाराज शिसोदिया राजपूत होते हा एक सार्वत्रिक समज आहे. निबंधववलीत सुद्धा शिवभारत, सभासद बखर, गागाभट्ट, जयसिंग यांचे दाखले दिले आहेत पण शिवभारत ते सूर्यवंशी असल्याचे सांगते तर सभासद बखर फक्त ते शिसोदिया वंशाचे राजपूत असल्याचा उल्लेख करते. ह्यात महाराजा जयसिंगाच्या एका पात्रातील उद्गार दिले आहे ज्यात तो भोसल्यांशी सोयरीक करण्यासाठी सांगण्यात आले तर ती करेन असे म्हणतो पण त्याच पत्रात तो हे घराणे अतिशय हीन असल्यान...
Posts
Showing posts from May, 2020
- Get link
- X
- Other Apps
इतिहास संशोधन आणि मी इतिहास संशोधन म्हटलं कि अनेकांच्या पोटात गोळा येतो . पण मला लहानपणापासून ह्याच गोष्टीचा जास्त आकर्षण वाटते . लहानपणापासून मी आपल्या मराठीतील सर्व ऐतिहासिक कादंबऱ्या मराठी रियासत चे सर्व खंड , बाबासाहेब पुरंदरे यांचे राजा शिव छत्रपती इ . पुस्तके मी आवडीने वाचत आलो आहे . सध्या लॉकडाउन च्या काळात माझ्या वाचनात एक पुस्तक वाचनात आला ते म्हणजे शिव चरित्र निबंधावली . त्यानंतर मी माझे ह्या क्षेत्रातील मार्गदर्शक संजय क्षीरसागर सरांशी चर्चा केली आणि एक धाडसी उपक्रम हाती घेत आहे तो म्हणजे ह्या शिव चरित्र निबंधावली वर एक लेख मालिका लिहिण्याचा . कितपत जमेल माहित नाही पण ह्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे . इतिहास संशोधन हा एक नवा प्रांत आहे कारण आपल्याकडे इतिहास हि खूप संवेदनशील पण तितकीच जास्तीत जास्त विकृत केलेली गोष्ट आहे त्यामुळे खूप सांभाळून लिहावं लागणार आहे . ह्यात एकाच दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे ...
- Get link
- X
- Other Apps
कोरोना, पॉझिटिव्हिटी आणि मी काय कुठला तो दिसूही न शकणारा विषाणू आला आणि त्यानं सगळं जग एका क्षणात बंद करून टाकलं. कधीही बंद न होणारी मुंबई सुद्धा एका झटक्यात बंद झाली. माझंही ऑफीस बंद असल्यामुळे आम्हांला घरीच थांबायची वेळ आली. घरातील सगळी माणसं घरातच थांबली, बाहेर पडणं बंद झालं, बाहेर पडायचा आणि पोलिसांचे दणके खाऊन घरी यायचा असं काहीतरी होईल म्हणून बाहेर जाणंच नको असं काहीतरी व्हायला लागला. सतत बातम्यांमध्ये दाखवली जाणारी मृत्यूंची, रोग्यांची वाढती संख्या यांमुळे आपला पण नंबर त्यात लागेल काय ? अशी भीतीही तयार बी=व्हायला लागली. घरात कधी नव्हे ते लॉकडाउन चुकीचा कि बरोबर, उद्धव ठाकरे खरंच चांगलं काम करत आहेत कि मोदी? दिवे लावणे, थाळ्या वाजवणे यांनी काही फरक पडेल का अश्या चर्चा रंगू लागल्या. थोड्याफार प्रमाणात भांडणे झाली. नंतर हळूहळू ह्या सगळ्याची जागा वैतागाने आणि चिंतेने घेतली, आपल्या नोकऱ्यांचं काय होणार? राहणार कि जाणार? ह्या चिंतांनी मनात खळबळ माजू लागली आहे. कधी घराबाहेर पडायचा प्रसंग आलाच तर बाहेर दिसणारी दृश्य त्या दुकानांसमोरच्या रांगा घरी आलं कि लगेच हात- पाय ...